Monday, February 15, 2021

स्मशान शांतता!!!

 आज मन सुन्न झाले आहे..

एक मुलगी आत्महत्या करते..

ती गरोदर असते..


एक ५० वर्षाच्या मंत्री बरोबर तिचे संबंध असल्याचे ढळढळीत दिसत आहे..तिच्यावर नजर ठेवायला दोन कार्यकर्ते ठेवले आहेत..

ती आत्महत्या करते..

मग ती मानसिक रुग्ण ठरवले जाते

मग तिला सोरायसिस असल्याचे अफवा उठवली जाते..


तिचा मृत्यू झाल्यावर तिचे शवविच्छेदन नीट होत नाही

पोलिस अधिकारी सरळ सरळ सांगतात ऑडियो क्लिप मधे काहीच नाही आढळत..

@abpmajhatv @TV9Marathi त्या मंत्राचे गुणगान करण्यात मश्गूल होऊन जातात..

संध्याकाळ होता होता मुलीचा बाप सांगतो तिने आम्ही कर्जबाजारी असल्याने आत्महत्या केली..


सगळे आपल्या सामान्य जनतेच्या डोळ्यासमोर घडत असते..

राजकारण करणारे करत राहतात..

क्षणिक पैसा आणि जातीच्या दबावाला मुलीचा बाप पण बळी पडत असतो.

मंत्री ज्या पक्षाचा आहे तो उजळ माथ्याने सांगायला लागतो की ही बदनामी ची चाल होती..आम्ही नाकाम केली.

ते दोन कार्यकर्ते चिकन मटण खाऊन झोपतात..


फक्त दोन आत्मा रडत असतात..

एक ती मुलगी #पुजाचव्हाण आणि तिच्या पोटातील निष्पाप जीव..

कसे ग्रामीण भागातील मुलीला पुण्यात आणून.. शरीर संबंधला भाग पाडून गरोदर ठेवले जाते आणि मृत्यू नंतर पण हेळसांड केली जाते..

पण ना कोणी तिला न्याय मिळवून देणारे भेटते ना कोणी तिची बाजू लढणारे..


आज न्याय रडत असतो..

न्यायदेवता रडत असते..

पण ना तिच्या समोर ना गुन्हा घडला असतो ना गुन्हेगार उभा असतो..

असते ती फक्त सत्तेसमोर झुकणारी अधिकारी..

असते ती फक्त पोलिसांची लाचारी..

हताश जनता आणि सुन्न करणारी विराण शांतता..

कारण एकच असते..


व्यर्थ हे सारेच टाहो..

एक ही ध्यानात राहो..

मूठ पोलादी जयाची..

ही धरा दासी तयांची..


आज मानवता शरमली.. न्याय देवता ओशाळली..


आणि


सामान्य जनता आणि न्याय ह्यामधील अंतर कित्येक कोसांनी अजुन वाढले..


मागील महिन्यातील प्रकरण समोर येते..

ह्याच सरकार मधील एक मंत्री अत्याचार करत असल्याची तक्रार केली जाते..

मुलगी २० वर्षाची असते..

मग जगाला कळते की हिच्या मोठ्या बहिणी बरोबर अनैतिक संबंध असतात त्या मंत्रीचे आणि त्यातून त्याला दोन मुले पण असतात..

मंत्री मोठ्या थाटात जगासमोर येतो..


सगळ्यांना सांगतो माझे संबंध आहेत..

माझा बायकोला ते मान्य आहे..

माझे पाच मुले आहेत.. आणि त्यातील दोन अनैतिक संबंध मधून जन्माला आले आहेत..

पण ह्या मुलीचा आणि माझा काही संबंध नाही

मग त्याचे इतर मित्र समोर येतात..

त्या मुलीवर तक्रार दाखल करतात..

दबावतंत्र वापरतात..


मंत्री असलेला पक्ष नेता पण त्याची पाठ राखण करतो..

इतर लोक म्हणतात की माणूस मोठा झाल्या मुळे बदनाम करत आहेत त्याला..

त्या मुलीच्या तक्रारीचा विसर पडतो..

तिला कळते न्याय मिळणार नाही..

मग ती तक्रार माघे घेते..त्या बदल्यात काय मिळते तिला हे सांगायची खरेच गरज आहे का इथे..


मग चालू होतो त्या मंत्र्याचा दौरा आणि त्याचे भव्य स्वागत. 

त्याच्या आईच्या डोळ्यातील अश्रू दिसत असतात आता @abpmajhatv @TV9Marathi ह्या चॅनल ला..

ढोलताशे वाजू लागतात..

त्यांचा आवाज वाढत जातो..

कानठळ्या बसू लागतात..

सामान्य जनता मात्र त्या आवाजाने बधीर होऊन जाते..


एक लहान मुलगी तो आवाज ऐकुन तिच्या आईला विचारते..

आई, काय पराक्रम केला आज ह्या माणसाने..??

आई अनुत्तरित असते आणि 

छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्री..महिला सुरक्षित नाही हे ज्वलंत सत्य असते..जे ती तिच्या मुलीला सांगू शकत नाही..


अशा अधेड बाप्यापासून आपल्या मुलीचे संरक्षण कसे होणार ह्यातच ती चिंताग्रस्त होऊन जाते..

आणि 

आज पुन्हा एकदा 

न्यायदेवता आणि मानवत ओशाळली जाते..

निर्लज्ज सरकार त्यांची री ओढत राहते..

सामान्य जनता लोकल चालू झाली ह्यातच खुश होते..

आणि.

न्याय आणि सामान्य जनता ह्यातील अंतर प्रचंड वाढते


आज हेच अधोरेखित होत राहते.

की.


व्यर्थ हे सारेच टाहो

एक ही ध्यानात राहो

मूठ पोलादी जयाची

ही धरा दासी तयांची..


@BudhojiRao