कुठून आणतात एवढा तिरस्कार ही लोकं ???
एकेकाळी स्वतः राज ठाकरे जाहीर सभेत बोलायचे,की अमिताभ बच्चन महानायक असून महाराष्ट्रासाठी काही करत नाहीत, त्यांच्या स्वतःच्या राज्यात मात्र देणगी देतात, मग जिथे राहता तिथे का नाही...???
आणि आज तोच माणूस, जमेल त्या प्रकारे काही ना काही तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो समाजासाठी, तर हीच लोक आज अक्षय कुमार वर टीका करत आहेत कशासाठी? हा दुटप्पीपणा कशासाठी? दुसऱ्यांना अधिकार आहे का नाही, हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला??
तो करोडोंवर कमावतो, तर उपकार नाही करत,
तो टॅक्स भरतो, तर आमच्या जीवावर कमावतो,
तो भारताबद्दल बोलतो, तर तो कॅनेडियन आहे,
तो देशभक्तीपर चित्रपट बनवतो,तर तो भांडवल करतो,
तो मोदींची मुलाखत घेतो, तर तो देशद्रोही आहे,
तो मेट्रोबद्दल बोलतो, तर त्याला अधिकार नाही,त्याने तोंड घालू नये
पण हा 'तोच' आहे
जो पूरग्रस्तांना मदत करतो,
जो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करतो,
जो कॅन्सर पिडितांना मदत करतो(जाहीर न करता, पोलीस अधिकाऱ्यांनी हे उघड केलं),
जो देशातील सर्वात जास्त सन्मानित सेवेत आपला जीव गमावणाऱ्या 'भारतीय' सैनिकांच्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो,
तो "भारत के वीर", या कसल्याच प्रकारचा मध्यस्थी नसलेल्या App ची संकल्पना मांडतो, स्वतःच्या प्रभावाचा वापर करून ते अस्तित्वात आणतो, ५० लाखांहून अधिक लोकांनी याचा वापर केला, करोडो लोकांनी अनाथ झालेल्यांसाठी देणग्या दिल्या, अनेक कुटुंबाना आधार मिळाला...
तरी तो काय करतो???
हे नीट समजून घ्या👇🏽
इंडस्ट्रीत सध्या सुपरस्टार मोजून ६, सगळ्या निर्मात्यांची आणि वितरकांची इच्छा असते की या स्टार्सनी खूप चित्रपट करावेत, पण हे बहुतांश स्टार्स वर्षांतून फक्त १ किंवा २ चित्रपट करतात, (त्यांची वयक्तिक कारणं असतील)
पण अक्षयकुमार दर वर्षाला ४ चित्रपट करतो,
एका चित्रपट निर्मितीत,
१० ते १५ प्रमुख कलाकार,
७० ते १०० च्या जवळपास सेट वरची टिम,
१०० च्या जवळपास ज्युनिअर आर्टिस्ट,
पोस्ट प्रोडक्शन सिंगिंग,एडिटिंग, डबिंगसाठी काम करणारी वेगळी टीम,
PR आणि मार्केटिंग साठी एक टीम,
आणि त्यानंतर देशभरातले वितरक,थेटर मालक हे सगळे समाविष्ट असतात
हे सर्व कमावतात जेंव्हा एक सुपरस्टार एका चित्रपटासाठी तयार होतो, जेंव्हा हाच चित्रपट १०० ते २०० करोड कमावतो त्यातून साधारण २० ते ४० करोड मनोरंजन कर शासनाला जातो, असे वर्षातून एकामागून एक चित्रपट 'तो' करतो, वितरक आणि निर्माते त्याला 'मिनी इंडस्ट्री' म्हणतात, कारण तो काम करतो
इतकी जुनी इंडस्ट्री, एकाहून एक मातब्बर, तरी अक्षयकुमारनेच स्टंटसमन आणि त्यांच्या कुटुंबाचा मुद्दा वरच्या पातळीवर घेतला, कारण ते स्वतःचा जीव धोक्यात घालून सुपरस्टार्सना मोठं करतात,
ही सगळी लोकं त्याला नेहमीच आपलं म्हणतात, त्याला डोक्यावर घेतात, मान देतात...
तरी 'तो' कोण ???
इतका मोठा सुपरस्टार, अनेक निर्माते अवलंबून, तरी हा माणूस नेहमीच त्यांच्याशी साधारण वागतो, वेळ पाळतो, निर्देशकाचे ऐकतो, Tantrums नसतात,
तो पडद्याआड तुम्हाला चांगल्या सवयी शिकवतो, स्वतः पाळतो, ९ वाजता झोपतो, ४ ला उठतो, पार्ट्या टाळतो, ड्रिंक्स, धुम्रपान टाळतो,
IAS ऑफीसर्स च्या batch ला (LABSNAA मध्ये) 'तो' ट्रेनिंग सेशन देतो,
IPS अधिकारी बरोबर ( SPVNPA मध्ये) ज्युडो चे सेशन करतो,
तरुणांनी अनुकरण कराव्या अशी जीवनशैली जगतो,
कुठल्याही सुपरस्टार च्या स्टेटस ला घाम फुटेल, अशा "Padman" आणि "टॉयलेट एक प्रेम कथा" सारख्या सामाजिक विषयावर तो बिनधास्त चित्रपट करतो, सामाजिक जागृती करतो...
तरीही 'तो' कोण???
जर एक 'कॅनेडियन' हे सर्व काही करतोय, तर भारतीय म्हणून, निरर्थकपणे बोंब ठोकणाऱ्या तुम्हाला "लाज" वाटली पाहिजे...
त्याचं मेट्रोबद्दलचं विधान सोडा, तुम्हाला त्याच्या विधानाबद्दल लुडबूड करण्याचा अधिकार काय?
तुम्हाला चांगलं करता येत नसेल... तर निदान घाण तरी करू नका...
तिरस्कारापोटी इतकेही अंध होऊ नका की चांगल्या आणि वाईटातला फरक देखील समजायला नको, तो तर ढुंकूनही भाव देत नाही अशा टीकेला, 'खिलाडी' साठी या गोष्टी चिल्लर आहेत, हा तोच आहे जो स्वबळावर सुपरस्टार आहे, तुमच्या नावडत्या नेत्याची त्याने मुलाखत घेतली म्हणून त्यासाठी इतकी आगपाखड???
BJP ला विरोध, मान्य.
मोदींना विरोध, मान्य.
प्रकल्पाला विरोध, मान्य.
पण, एखाद्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याला विरोध???
मान्य नाही !!!
'तो' जो बोलतो, ते करतो... आणि जे बोलत नाही... तेही करतो !!!
म्हणूनच तो सच्चा खिलाडी असतो आणि फक्तं तोंडाची वाफ करणारे वाचाळवीर ज्यांची किंमत नखा मधील मळा एवढी..
🙏🏼
#AkshayKumar #Khiladi






